नमस्कार मंडळी
मित्रानो हिंदू धर्मात लग्नाआधी पत्रिका पाहण्याची प्रथा आहे. जन्म कुंडली मध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करत असतात आणि कुंडली जुळत असेल तर लग्न केले जाते . यामध्ये राशीचे गुणसुद्धा पाहिले जाते , कारण ज्योतिषशास्त्रानुसार तुमची राशी ही तुमच्या स्वभावातले गुणदोष दाखवत असते.
चुकून जर दोन विरुद्ध स्वभावाच्या राशीच्या व्यक्तींचे लग्न झालं तर भांडणं आणि वैचारिक मतभेद होऊ शकतात . यापासून वाचण्यासाठी लग्न करण्याआधी राशींचे स्वभाव माहिती असणे गरजेचे आहे . चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत राशी ज्यांनी एकमेकांशी लग्न करणे टाळायला फाहिजे
कर्क आणि सिंह राशी – ज्योतिष शास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ लागत नाही . कर्क राशीचे लोक हे त्यांच्या जोडीदाराशी भावनिक रित्या जोडलेले असतात, आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात, तर सिंह राशीच्या व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या राहतात . त्यांच्यात असुरक्षिततेची भावना राहते . अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत , त्यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ लागते .
कुंभ आणि मकर राशी – कुंभ आणि मकर या दोघांनाही नात्याबद्दल चांगली समज असते परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांचे एकमेकांशी पटत नसते . मकर राशीचे लोक खूप भावनिक राहतात आणि कुंभ राशीचे लोक मात्र प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेत असतात . हा फरक त्यांच्यात संघर्षाचे कारण बनु शकतो.
वृषभ आणि तूळ राशी – या दोन्हीं राशींचे लोक अतिशय बुद्धिमान आणि मोकळ्या मनाचे असतात. सुरवातीच्या काळात यांच्यात खूप चांगलं पटत परंतु दोघांचाही आग्रही स्वभाव. यामुळे हळूहळू ते दोघे एकमेकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आग्रह करू लागतात, आणि यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते . मित्रानो एकदा का नात्यांमध्ये अहंकार आला तर ते नात कमकुवत होण्याची शक्यता असते.
कर्क आणि धनु राशी – कर्क व धनु राशीची व्यक्ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही . कारण धनु राशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणं चांगल माहिती असतं. तर कर्क राशीच्या व्यक्तीवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडतं. त्यामुळे या जोडीच्या जीवनात अनेकदा भांडण आणि तणावाची परिस्थिती निर्माण होत असते .
मिथुन आणि कन्या राशी – मिथुन आणि कन्या राशीची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच असते . कन्या राशीच्या व्यक्ती खूप व्यवहारिक राहतात . आणि मिथुन राशीच्या व्यक्ती खूप भावनिक राहतात . त्यामुळे दोघांचीही मते एकमेकांशी जुळत नसतात . त्यांच्यात मतभेद उद्भवतात. खूप त्रास झाल्यानंतर जर कधी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर कन्या राशी सहजपणे पुढे जात असते . पण मिथुन राशीच्या लोकांना अशा परिस्थितीतून बाहेर पडणे अवघड जात असते .