नमस्कार मंडळी,
फक्त सोमवारी बोला हा एक मंत्र , पैसा वैभव आणि ऐश्वर्य आयुष्यभर कमी पडणार नाही.स्वामींचा वार हा गुरुवार आहे असे म्हणतात पण सोमवारच्या दिवशी स्वामींची विशेष पूजा केली जाते.प्रत्येक कामासाठी सोमवार हा शुभ मानला गेला आहे.सोमवारच्या दिवशी जर तुम्ही काही धार्मिक कार्य केले काही वस्तूंचे दान केले तर प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते.
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल तिथे नक्की यश मिळेल. जर तुम्हाला मानसिक , आर्थिक किंवा शारीरिक ताण असेल , घरात आजारपण असेल तर या दिवशी सोमवारच्या दिवशी कुलदैवताचे पूजा करावी. जर तुमच्या कुंडली मध्ये चंद्र कमजोर आहे तर या दिवशी तांदूळ आणि दूध या वस्तूंचे दान करावे.तसेच सोमवारच्या दिवशी स्वामींना म्हणजे हर हर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप उपाय केले जातात.शिव शंकर हे भोळे दैवत असून भक्तांनी केलेल्या छोट्या छोट्या उपायांनी देखील ते प्रसन्न होतात.
पण घरात सुख शांती राहावी , जीवनात यश प्राप्ती व्हावी त्यासाठी काही उपाय तुम्हाला या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी करायचे आहेत.घरामध्ये वाद विवाद होत असतील कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह होत असतील तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर सव्वा किलो तांदूळ अर्पण करायचे आहेत.शिव लिंगाजवळ तुपाचा दिवा लावून ओम सांब सदाशिव नमः या मंत्राचा जप करायचा आहे.तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेला या मंत्राचा मंत्र जप करू शकतात .
पण कमीत कमी २१ वेळा हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जप करण्यासाठी तुम्हाला रुद्राक्ष ची माळा वापरायची आहे. हा उपाय पती पत्नी दोघांनी एकत्र बसून केल्याने त्याचे खूप त्वरित फळ प्राप्त होते. प्रत्येक महिलेला असे वाटत असते कि आपले सौभाग्य नेहमीच सुरक्षित राहावे.आपल्या पाटील दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. सोमवारच्या दिवशी देवी पार्वती ला सौभाग्य अलंकार अर्पण करायचा आहे. सौभाग्याच्या वस्तू म्हणजे कुंकू हळद , हिरव्या बांगड्या , मंगळसूत्र , जोडवी या सारखे काही सौभाग्य अलंकार आहेत हे सर्व देवी पार्वती ला अर्पण करायचे आहे
देवी पार्वती समोर मागणी करायची आहे कि माझे सौभाग्य अखंड राहो आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळो , जर तुमच्या नोकरी मध्ये काही अडथळे येत असतील , बढती मिळत नसेल किंवा तुमच्या मनासारखी नोकरी नसेल तर सोमवारच्या दिवशी शिव लिंगावर बेलाचे पान , धोतत्रा, बेलाचे पान मध , दूध , तूप या सर्व वस्तू तुम्ही शिवलिंगावर अर्पण करा. या वस्तू अर्पण करण्याआधी तांब्याच्या कलशामधून शिव लिंगावर जल अर्पण करायचे आहे आणि ओम नमो शिवाय ह्या मंत्राचा १०८ वेळा जाप करायचा आहे.
तुमच्या आयुष्यात जर वरील समस्या असतील तर हे उपाय नक्की करून पहा आणि हे उपाय करत असताना पूर्ण विश्वास तुमचा असला पाहिजे. भगवान शिव शंकराच्या कृपा आशिर्वदाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील.घरात सुख समृद्धी आणि शांती येईल. आर्थिक अडचणी दूर होतील.जर तुमच्या घरात पैशाच्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतील.