नमस्कार मंडळी
आपण आपल्या आसपास असे अनेक लोक पाहातो ज्यांच्याजवळ बक्कळ पैसा आहे. खूप श्रीमंत आहेत अगदी कोणतेही नियम न पाळता. देवपूजा न करताही या लोकांकडे इतका पैसा असतो.घरातील वस्तू जर वास्तुशास्त्राप्रमाणे असतील तर आपल्या घरात भरभराट येते समृद्धी येते.
तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा भगवंतांची कृपा तुमच्यावर व्हायला हवी. भगवान विष्णू किंवा तुमची कोणतीही इष्टदेवता तुमच्यावर प्रसन्न व्हायला हवी. वास्तुशास्त्राचे नियम जर नियमित व्यवस्थित पालन केले तर दुःखाचे डोंगर दूर होऊन सुखाची सकाळ आपल्या आयुष्यामध्ये येते.
अतिशय प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं. घरामध्ये शांतता निर्माण होते भांडण-तंटे होत नाहीत. आणि सोबत ज्या घरी वास्तुशास्त्राप्रमाणे जर सगळ्या वस्तू जागच्या जागेवरती असतील तर त्या घरांमध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करत असते
याउलट जर घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार नीट नसतील तर मात्र घरावरती संकट कोसळतातघरामध्ये अशांती पसरते आपापसात मतभेद वाढतात तुमच्या आयुष्यात नेहमी आपल्याशी येत राहतो यावरून आपल्याला कळून चुकलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये वास्तुशास्त्राचा किती मोठा प्रभाव असतो
जर तुमच्या घरातील सगळ्या गोष्टी जर वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवल्या असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होत राहते.भगवान श्री कृष्णा सुद्धा वास्तुशास्त्राचे खूप मोठे जाणकार होते जेव्हा महाराज धर्मराज युधिष्टिर यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांच्या राज्यात सर्व सुविधा निर्माण व्हाव्यात प्रजा सुखी रहावी सगळीकडे शांतता राहावी
राज नेहमी प्रगती पथावर असावा म्हणून भगवान मुरलीधर यांनी महाराज युधिष्ठिर यांना वास्तुशास्त्राचे काही नियम समजावलं त्या भगवान युधिष्टिर यांना म्हणाले की पृथ्वी माती पासून बनलेली आहे आणि सगळ्यांना शेवटी या मातीमध्ये जायचं आहे म्हणून घराच्या सुख शांती साठी घरात मातीची भांडी आवश्य असावी मातीची भांडी घरांमध्ये असतील तर घरातील नैराश्य दूर होतं
अशा घरात देवी लक्ष्मी वास करते आणि या घरातील व्यक्तींना कधीही दुःख दारिद्र्य किंवा कोणतेही प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत नाही घरांमध्ये मातीची भांडी असणे फार आवश्यक आहे भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात घरांमध्ये जर ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला मातीचा माठ ठेवला असेल तर तुमच्या घरांमध्ये वैभव संपत्ती नांदू लागते
घराबाहेर ईशान्य दिशेला पक्षांसाठी एका भांड्यामध्ये नेहमी पाणी भरून ठेवावे तसेच घरामध्ये आग्नेय दिशेला माती पासून बनलेला एक पक्षी ठेवावा घरातील आग्नेय दिशेस मातीचा पक्षी ठेवल्यास घरातील जे वातावरण आहे.ते मंगलमय आणि प्रसन्न राहते आपल्या घरातील देवघरामध्ये चांदी सोने पितळ या धातूंपासून बनवलेल्या देवी देवतांच्या प्रतिमा असतात
मात्र त्याच बरोबर एक कोणत्याही देवी-देवतांची मातीची मूर्ती नक्कीच ठेवावी त्यामुळे आपल्या देवघराला पूर्णत्व प्राप्त होत यामुळे आपली देवपूजा संपन्न होते आणि आपल्या पूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत दररोज संध्याकाळी घरासमोर दोन मातीने बनवलेल्या पणत्या या नेहमी लावाव्यात.
प्रज्वलित करण्यासाठी गायीच्या दुधापासून बनवलेल्या साजूक तुपाचा वापर करावा असं केल्याने तुमच्या घरा मध्ये कधीही रोगराई प्रवेश करणार नाही हे वास्तुशास्त्राचे नियम पाळून तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू शकते एवढं बोलून श्रीकृष्ण शांत झाले पुढे या सगळ्याचा पालन करुन महाराज युधिष्ठिर यांनी अनेक वर्षे सुखांमध्ये राज्य सांभाळले होत.
त्याचा प्रमाणे आज या काळात काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.देव घरा मध्ये माता लक्ष्मी ची मूर्ती ही जरूर ठेवावी.माता लक्ष्मी जर तस्वीर किंवा फोटो हा नेहमी ठेवावा तर ती उभी नसावी बसलेल्या अवस्थेत आहे.तिच्या भक्ती भावाने श्रद्धेने पुजा करावी.खुप दिवसापासून गरीबी आहे.
झटपट उपाय हवं असेल तर माता लक्ष्मी ची चांदीची मूर्ती ठेवावी.असे केल्याने अतिशय शुभ परिणाम आपल्याला मिळतात.तर दुसरा उपाय आहे. बुधवारच्या दिवशी गणेशाच्या मंदिरामध्ये नक्की जा.गणपती बप्पाचे आशीर्वाद घ्या.आणि आपली ज्याप्रमाणे व तहसील परिस्थिती असेल त्याप्रमाणे १०१, ५०१, १००१ असे मंदिर मध्ये असणाऱ्या पुजारी यांना द्या.
परत पुजारकडून 1 रुपया मागून घ्या.तो एक रुपया घरी आणल्यानंतर आपल्या देऊ घरामध्ये ठेवा. आणि त्याच्यावरती आपण एक सुपारी ठेवायची आहे. रोज देव पूजा करताना आपण एक रुपया व सुपारीची देवपूजा करायचे आहे.तिसरा उपाय आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे.अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवायचं आहे.त्यामुळे आपली प्रगती वाढत जाते.
हे उपाय केल्याने तुमचं नशिब पालटुन जात.वास्तुशास्त्रानुसार सुद्धा फायदा होतो भगवंत ही तुमच्यावरती प्रसन्न होतात.चारी बाजुने तुमची भरभराट होण्यास सुरुवात होते.त्याच बरोबर मेहनत करण्यास कष्ट करण्यास परिश्रम करण्यास विसरू नका .
अंध श्रद्धा पसरवणे किंवा अंध श्रद्धेला खतपाणी घालणे किंवा त्या गोष्टी साठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही. फक्त हिंदू धर्मानुसार ज्योतिष शास्त्रानुसार काही समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी हे आपल्या पर्यंत पोहचवले जाणं.कोणत्याही अंध श्रद्धेला खतपाणी घातलं नाही.अंध श्रध्दा म्हणून याचा वापर करू नये.