वृषभ राशी एप्रिल २०२२ महिना घेऊन येणार आनंदाची बहार पुढील ५ वर्ष सुखाचे

नमस्कार मंडळी,

वृषभ राशी , एप्रिल महिना घेऊन येणार आनंदाची बहार , पुढील ५ वर्ष सुखाचे. वृषभ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. एप्रिल महिन्यापासून तुमचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. एप्रिल मध्ये बनत असलेली ग्रह दशा ,

ग्रहांची होणारी राशांतरे , ग्रह युत्या आणि ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्तिथीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर दिसून येईल. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. या काळात मंगळ , गुरु शुक्र , केतू हे लाभदायक ठरणार आहे. शुक्र केतू आणि मंगळ , गुरु तुम्हाला शुभ फळ देणार आहेत.

गुरुचे पाठबळ लाभणार असल्याने हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत घेत आहात किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रात तुम्हाला जास्त प्रमाणात लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. एखादे मोठे काम तुमच्या हातून यशस्वी होऊ शकते.

मागील अनेक दिवसापासून तुम्ही करिअर मध्ये करत असलेले प्रयन्त आता फळाला येणार आहे. करिअर मध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. नोकरी विषयक कामांना गती प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारायचा विस्तार घडून येणार आहे. नवीन सुरु केलेले व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे.

आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भाऊ बंधकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. त्यासोबतच मित्र परिवार किंवा नात्यामध्ये देखील चालू असणारे वाद आता दूर होणार असून मनोमिलन घडून येण्याचे संकेत आहेत.

प्रेम जीवनाविषयी हा काळ उत्तम असेल , प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनणार आहे किंवा या काळात प्रेम विवाह देखील जमून येऊ शकतात. हा काळ तुमच्या साठी सर्वच दृष्टीने लाभकारी आणि शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्याच बरोबर चुकीच्या किंवा वाईट कामांपासून दूर राहणे देखील तुमच्या हिताचे ठरणार आहे. या काळात व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे. हा काळ आर्थिक उन्नती साठी लाभकारी ठरू शकतो. पण आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग तुमच्या कामावर प्रसन्न असतील.

राजकीय दृष्ट्या काही अनुकूल घडामोडी तुमच्या जीवनात घडून येणार आहे. धार्मिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. धार्मिक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. या काळात अध्यात्मिकाची देखील आवड निर्माण होईल. कलाकार , साहित्यकार लोकांसाठी काळ उत्तम फलदायी ठरू शकतो.

पत्रकारांसाठी आनंदाचे दिवस येणार आहे. उद्योग व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम लाभकारी ठरणार आहे. नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. या काळात वैवाहिक जीवनात पती पत्नी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून मनोमिलन घडून येणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने मोठी झेप घेऊ शकता.

उद्योग व्यवसायात खूप मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *