नमस्कार मंडळी,
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा मांगलिक कार्य असो किंवा धार्मिक कार्य असो हळद हि वापरली जाते.हळद औषधी म्हणून उपयोगी आहे.याच बरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये हळदीचे अनेक उपाय सांगितले आहे.हळदीचा वापर करून तुमच्या जीवनातील अनेक समस्या तुम्ही दूर करू शकता.हळदीचा पिवळा रंग हा बृहस्पती ग्रहाशी जोडलेला आहे
आणि म्हणूनच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बृहस्पती ला मजबूत बनवण्यासाठी हळदीचे अनेक उपाय केले जातात. हळदीचे उपाय करून तुम्ही जीवनातील धन संपत्ती च्या समस्या सुद्धा दूर करू शकता. हळकुंड जर तुम्ही पिवळ्या दोऱ्यामध्ये बांधून तुम्ही दंडामध्ये किंवा गळ्यात घातले तर तुमच्या कुंडलीमधून बृहस्पति ग्रह मजबूत होतो.
शुभ फळांची प्राप्ती होते व धन संबंधित सर्व समस्या दूर होतात.हळद हि फक्त पिवळ्या रंगांची च तर नाही तर काळ्या आणि नारंगी रंगाची असते.पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पति ग्रहाशी आहे तर काळ्या हळदीचा संबंध हा शनी देव आणि नारंगी रंगाच्या हळदीचा वापर हा मंगळ ग्रहाची केला जातो
ज्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सफलता मिळवायची आहे किंवा एखादे महत्वाचे कार्य आहे ज्या मध्ये यश प्राप्त करायचे आहे.अशा लोकांनी त्या कामासाठी बाहेर निघताना दररोज हळदीचा टीका लावून घराबाहेर पडायचे आहे, यामुळे तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडत आहात ते काम निश्चितच सफल होईल.तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळेल.
ज्या व्यक्तीच्या कार्यामध्ये अडचणी येत आहेत , विवाहात समस्या येत असतील तर अशा लोकांनी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि त्या पाण्याने स्नान करायचे आहे.या बरोबरच हळद मिसळल्या पाण्याने सूर्य देवाला अर्घ्य द्यायचे आहे. हे अर्घ्य घेताना त्या तांब्यावर सुद्धा हळदीने टिळक करायचा आहे.अर्घ्य दिल्यांनतर हीच हळद तुम्हाला कपाळावर आणि गेल्यावर लावायची
आहे.यामुळे तुमच्या विवाहामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत , ज्या काही बाधा येत आहेत त्या सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग जुळून येतात.याच बरोबर इतर लोक देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिसळू शकतात. यामुळे तुमचे तेज वाढते , तुमच्या आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती तुमच्या पासून दूर राहते.
याच बरोबर कोणत्याही वाईट दृष्टीचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही.जर घरामध्ये सतत वाद विवाद कटकटी होत असतील तर अशा वेळी घरामध्ये हवन करून त्या हवनामध्ये हळदीचा वापर करावा.तसेच घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीने टिळक करावे.यामुळे घरातील वाद विवाद कटकटी दूर होऊ लागतात.
तुमचे दुर्भाग्य दूर करण्यासाठी म्हणजे जर धन संचय होत नसेल , पैसा पाण्यासारखा वाहून जात असेल , तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे.हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळ्या हळदीचा वापर करायचा आहे.काली हळद तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानात कुठेही मिळून जाईल. तर अशी हळद तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे.
घरी आणल्यानंतर तुमच्या कडे जर चांदीची डबी असेल तर त्या डबीमध्ये हि काली हळद , थोडेसे नाग केशर आणि थोडेसे कुंकू ठेवायचे आहे. जर तुमच्या कडे चांदीची डबी नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही धातूची , तांब्याची असेल किंवा स्टील ची असेल किंवा पितळेची डबी या ठिकाणी वापरू शकता.फक्त प्लास्टिक च्या डबीचा वापर इथे करू नका.
आता या डबीमध्ये काली हळद , थोडेसे कुंकू आणि नाग केशर ठेवून हि डबी देवीच्या पायाशी स्पर्श करून घ्यायची आहे.तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ या डबीने स्पर्श करायचा आहे आणि नंतर तुम्ही ज्या ठिकाणी धन ठेवता त्या ठिकाणी हि डबी ठेवून द्यायची आहे.
हि डबी ठेवताना ओम श्री महालक्ष्मयो भ्योम नमः या मंत्राचा जाप करायचा आहे आणि तुमच्या मनात जी इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे. तुमच्या घरामध्ये धन टिकून राहावे , विनाकारण खर्च होऊ नये ,घरातील आजारपण दूर व्हावे अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. ज्या क्षणी तुम्ही हा उपाय कराल अगदी त्या क्षणापासून तुमच्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग खुले होतील
आणि तुमच्या घरामध्ये धन टिकून राहील. याच बरोबर घरात एखादी वाईट शक्ती असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सुद्धा नाहीशी होईल. हे उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करून पहा.