नमस्कार मंडळी
माता लक्ष्मीची कृपा ज्या माणसावर होते किंवा ज्या राशीवर होते तेव्हा त्यांचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार सांगितले जाते कि जीवनामध्ये कितीही कठीण काळ चालू असुद्या पण ग्रहनक्षत्रांची अनुकूलता असल्यास कठीण काळ बदलायला वेळ लागत नाही. व्यक्तीच्या जीवनामध्ये हे काही दुःखाचे दिवस येत असतात ते एकतर त्या व्यक्तीच्या कर्मामुळे किंवा ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे.
जेव्हा ह्याच ग्रह नक्षत्रांचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव व्यक्तींच्या जीवनावर पडतो तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि देवाची कृपा झाल्यानंतर रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. उद्या मंगळवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव ह्या राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे.
आता इथून पुढे नशीब पुरेपूर साथ देणार असून यश प्राप्त होणार आहे.प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.आज मध्यरात्री नंतर पौष शुक्ल पक्ष कृतिका नक्षत्र असून ३ जानेवारी मंगळवार येणार आहे. मंगळवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. मंगळवार चे व्रत हे माता लक्ष्मी ला समर्पित असते .दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी मंगळवारी उपवास केला जातो.
श्री विष्णू हे लक्ष्मी माता चे पती असून ज्या व्यक्तींवर विष्णूंची कृपा होते त्यांना आपोआपच माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होतो. माता लक्ष्मीच्या कृपेने आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. चला तर पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी-
मेष – मेष राशीच्या लोकांना शुभ काळ चालू झाला असून , माता लक्ष्मी आणि श्री विष्णू च्या कृपेने शुभ घटना घडून येणार आहे. ह्या राशीच्या लोकांमध्ये चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे.आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आता मोकळे होणार असून धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. व्यापारामध्ये पैशाची गुंतवणूक करू शकता पण गुंतवणूक करताना विचार करून केली पाहिजे.वैवाहिक जीवनामध्ये असणारा ताण तणाव आता दूर होणार आहे.काळ थोडासा कठीण असला तरी माता लक्ष्मी चा आशीर्वाद सदैव राहणार आहे.
मिथुन राशी – या राशीसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने मागील काळामध्ये अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे.उद्योग व्यवसायामध्ये लावलेली योजना आता पूर्ण होणार आहे.कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीआड येणारे अडथळे दूर होणार असून यश प्राप्त होणार आहे. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.पैशांचे व्यवहार करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक अडचण दूर होणार असून उद्योग व्यापारामध्ये आर्थिक आवक वाढणार आहे.कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.
सिंह राशी– या राशीच्या लोकांना परिस्थिती अगदी अनुकूल बनत आहे. नोकरी क्षेत्रामध्ये कामाचे कौतुक होईल.सरकारी कामांचे अडचणी दूर होणार असून अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे.उद्योग व्यापार , कार्यक्षेत्रामध्ये नवीन कलाटणी येणार असून योजलेल्या योजना पूर्ण होणार आहे. आर्थिक अडचणी दूर होणार असून कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे.
कन्या राशी– कन्या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे.कार्यक्षेत्रातून कमाईमधून वाढ दिसून येईल,सध्या चालू असणारा काळ कठीण वाटत असला तरी लवकरच माता लक्ष्मीच्या कृपेने सकारात्मक गोष्टी घडून येणार आहे.अचानक धन लाभाचे योग जुळून येऊ शकतात.आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ ठरणार असून या काळामध्ये केलेली गुंतवणूक पुढे जाऊन लाभदायक ठरणार आहे.वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढणार असून वाद कमी होणार आहे.
वृश्चिक राशी– हा काळ ह्या राशीसाठी अत्यंत लाभदायक आणि शुभ असणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपा तर होईलच पण भगवान विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहे.मागील काळात अडलेली कामे आता पूर्ण होणार आहे.आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार असून धैर्य पूर्ण करून दाखवणार आहेत.प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.नशिबाची साथ आणि करत असलेले प्रयन्त यामुळे यशामध्ये येणारे अडथळे दूर होणार आहे.वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहे आणि भविष्याविषयी ठरवलेले नियोजन सफल होणार आहे.
धनु राशी– ह्या राशीच्या लोकांना परिस्थिती अनुकूल बनत असून माता लक्ष्मी च्या कृपेने सुखाचे दिवस येतील.मागील काळामध्ये अडचणींमध्ये आलेले उद्योग व्यवसाय पूर्व पथावर येतील. कार्यक्षेत्राविषयी योजलेल्या योजना सफल होणार आहे.केलेल्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबामध्ये भौतिक सुखांमध्ये वाढ होणार असून सांसारिक सुखाची वृद्धी होणार आहे.विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाह जुळून येणार आहेत.
मकर राशी- माता लक्ष्मीच्या कृपेने दुःखाचे कठीण दिवस संपून सुखाचे दिवस येणार आहे.धन लाभाचे योग जुळून येणार आहेत नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांना सुरुवात करणार आहेत.या काळामध्ये स्वार्थी मित्रांपासून सावध राहा वाईट कामांपासून दूर राहा. भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्तीबरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार आहे.
कुंभ राशी– या राशीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ची विशेष कृपा बरसणार असून जीवनामध्ये मांगल्याची सुरुवात होणार आहे.प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा , मनोकामना आता पूर्ण होणार आहेत.