कोणत्या राशींच्या कपल्सचे पटणं कठीण आहे ?

नमस्कार मंडळी

आपल्या कडे मुलगा आणि मुलगी यांची जन्म पत्रिका बघणे हे महत्त्वाचे मानलं जातं. जन्म पत्रिके नुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात येतं. आज आपण राशीच्या अशा काही जोड्या बदल जाणून घेणार आहोत.जन्म पत्रिके नुसार त्यांच्या स्वाभावचा त्रास एकमेकांना होऊ शकतो.

पण अर्थात ज्योतिष शास्त्र मध्ये या जोड्यांचा लग्नाला वर्ज मान्यत आलं नाही. त्यामुळे या जोड्यांचा लग्न होऊ शकतो. सामंजस्याने आणि उत्तम रित्या निभावला ही जाऊ शकतं. फक्त त्यांचे स्वभावातले काही गुण असे असतात की ज्याचा त्रास त्यांच्या जोडीदाराला होऊ शकतो. आणि त्याच दोष आपण आज जाणून घेणार आहोत.

पहिली जोडी आहे मकर आणि मेष – मकर राशीचे लोक चांगले विचाराचे असततात आणि उत्तम राहणीमान असणारे सुद्धा असतात. तर मेष राशीचे लोक अति उत्साही असतात. पण मेष राशीच्या लोकांना समोरच्या व्यक्तीला सतत नियंत्रण ठेवण्याची सवय असते. मात्र या गोष्टीला मकर राशीचे लोक सहन करू शकत नाही. आणि त्यामुळे या दोन राशींमध्ये खटके उडण्याची शक्यता असते.

कुंभ आणि वृषभ – वृषभ राशी अतिशय हुशार आणि उर्जेने भरलेली राशी आहे. आणि कुंभ ही अतिशय अभ्यासू राशी आहे. वृक्षभ राशीची लोका जिद्दी आणि दृढ असतात. तर कुंभ राशीची समंजस आणि धीर गंभीर असतात. वृषभ राशीच्या लोकांना कुंभ राशीचा धीर-गंभीर पणा जरा कठीण जातं. कुंभ राशीची लोक खुल्या विचारांचे असतात तर वृषभ राशीच्या लोकांना ते फारसं जमत नाही. आणि त्यामुळे या दोन राशींमध्ये खटके उडू शकतात. पुढची रास आहे

मीन आणि मिथुन – मीन राशीची लोकं दुसऱ्यांची सतत चिंता करणारे असतात. त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करणारे असतात. या उलट मिथुन राशीचे लोक जे बोलतात ते न करता दुसरच काहीतरी करतात. त्यामुळे या दोन राशींचे एकमेकांशी जुळण जरा कठीण होऊन जातात.

मेष आणि कर्क – दृढनिश्चयी धारदार स्वभावाचा मेष राशीचं लोकांना जेव्हा सोम्या राशीचे म्हणजे कर्क राशीचे लोक भेटतात. तेव्हा त्यांचे खटके उडू शकतात. कारण कर्क राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय सोप्या आणि शांत असतो. या दोन राशीचे लोक एकमेकांचे उलट असतात. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत राहतात.

वृषभ आणि सिंह – सिंह राशीचे लोक आत्मकेंद्री असतात त्यांना लाइमलाईटमध्ये राहायला आवडतं. मात्र याउलट वृषभ राशीचे लोक सहस्वभाव ची असतात. त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांमध्ये भांडण होण्याची शक्यता असते.

मिथुन आणि कन्या – मिथुन राशीचे लोक उत्साही आणि मौजमजा करणारी असतात याउलट कन्याराशीचे लोकांना स्वतःच्या कामामध्ये मग्न राहायला आवडतं. त्यामुळे या दोन्ही राशींची लोकं जवळ आली तर काही ना काही कुरुबुरी होत राहतात.

सिंह आणि वृश्चिक – सिंह राशीचे लोक नेतृत्व करण्यात उत्तम असतात वृश्चिक राशी चे लोक जिद्दी आणि कठोर असतात त्यामुळे या दोन्ही राशींमध्ये वाद होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे दोन्ही राशीच्या लोकांचा स्वभाव स्थिती असल्यामुळे माघार कोण घेणार.
पर्या होतात या जोड्या ज्यांच्या स्वभावाचा त्रास एकमेकांना होऊ शकतो

भारतात ज्योतिषशास्त्रानुसार त्यांचं लग्न काही वज्य सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे अर्थातच लग्न होऊ शकतो आणि लग्न टिकण्यासाठी प्रेम आणि सामंजस्याची गरज असते.

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *