५ मिनिटे ही वस्तू हातात ठेवा नकारात्मक विचार नष्ट होईल

नमस्कार मंडळी ,

श्री स्वामी समर्थ ५ मिनिट ठेवा हातावर मीठ मग पहा चमत्कार मित्रांनो आज पर्यंत तुम्ही मिठाचे अनेक उपाय पाहिले असतील पण आज आपण मिठाचा असा एक उपाय पाहणार आहोत जो लगेच परिणाम दाखवतो मित्रांनो आजकालच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण मानसिक तणावात जगत आहे

यामुळे कोणतेही काम करण्यात आपलं मन लागत नाही मन उदास राहते किंवा सतत मनात नेगेटिव्ह विचार येत राहतात कधी कधी असे वाटू लागते की आपल्यामध्ये नकारात्मक विचार वाढले आहेत यापासून सुटण्याचा एक प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय आपल्याला सोमवार बुधवार किंवा शुक्रवार यापैकी कोणत्याही एका दिवशी सुरू करायचा आहे

आणि पुढे सतत तीन दिवस करायचा आहे म्हणजेच जर आपण उपाय सोमवारी सुरू करत असाल तर सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस जर तुम्ही उपाय बुधवारी सुरू करत असाल तर बुधवार गुरुवार शुक्रवार हे तीन दिवस आणि जर तुम्ही हा उपाय शुक्रवारी सुरू करत असाल तर शुक्रवार शनिवार आणि रविवार असे तीन दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे

उपाय करण्यासाठी आपल्याला हातामध्ये थोडेसे मीठ घ्यायचे आहे डोळे बंद करून आपल्या इष्ट देवतेला प्रणाम करून असे ध्यान करावे की आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा आपल्या हातातील मिठामध्ये विसर्जित होत आहे पाच मिनिटांनंतर हे मीठ वॉश बेसिन किंवा टॉयलेट मध्ये टाकून फ्लश करावे हा अदभूत प्रयोग तुम्हाला तीन दिवस करायचा आहे

या उपायाने तुमच्या मनातील निगेटिव्ह विचार दूर होतील मन प्रसन्न राहील प्रत्येक व्यक्तीने महिन्यांमध्ये एकदा हा प्रयोग अवश्य करावा हा उपाय केल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल मन प्रसन्न राहील यामुळे तुम्ही हातात घेतलेलं कामे यशस्वी होईल तर मित्रांनो तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा

 

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *