१२ वर्षांनंतर मीन राशीत येणार देव गुरु बृहस्पति, या तीन राशींना येणार ‘अच्छे दिन’

नमस्कार मंडळी

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रह राशी असते किंवा उदय-अस्त होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो असतो . १३ एप्रिलला देव गुरु बृहस्पती स्वतःच्या मीन राशीत गोचर करणार असून . गुरू ग्रह एका राशीत १२ महिने म्हणजेच एक वर्ष असतो. १२ राशीत भ्रमण करताना त्या प्रत्येक राशीत जाण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागत असतो .

त्यामुळे या संक्रमणाचं महत्त्व अधिकच वाढले असून . ज्योतिष शास्त्रामध्ये गुरूचा संबंध ज्ञान, वाढ, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशी आहे. त्यामुळे गुरु ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. पण कोणत्या तीन राशी आहेत, ज्यांना या राशी बदलामुळे विशेष फायदा होणार आहे .

चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन राशी…

वृषभ राशी – गुरूचे संक्रमण तुमच्या राशीतून अकराव्या स्थानात असणार आहे . या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हंटले जाते . त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढणार आहे . तसेच नवीन स्रोत तयार होणार आहे व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. व्यावसायिक करार अंतिम होऊ शकतो. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे . या काळात तुमची कार्यशैली देखील , ज्यामुळे तुमचा बॉस तुमच्यावर खूश असणार आहे आणि तुमची प्रशंसा करेल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल असणार आहे

मिथुन राशी – तुमच्या राशीतून गुरु ग्रह दशम भावात प्रवेश करणार आहे , ज्याला करिअर आणि नोकरीचे स्थान म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे . तसेच तुमची बढती होण्याची शक्यता असणार आहे . व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.

नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होणार आहे आणि व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे . जे मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. दुसरीकडे, मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आणि गुरु ग्रहामध्ये मैत्रीची भावना असणार आहे . त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे

कर्क राशी – तुमच्या संक्रमण कुंडलीत गुरू ग्रह नवव्या भावात भ्रमण करणार , जो भाग्याचे घर आणि परदेश प्रवास असल्याचे सांगितले जाते. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे . यासोबतच रखडलेली कामे ही होतील. त्याच वेळी, आपण व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकणार आहे , जे फायदेशीर सिद्ध होईल.

दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल, रेस्टॉरंटशी संबंधित आहे, अशा लोकांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *