नमस्कार मंडळी,
आज पापमोचनी एकादशी करा उपाय हा ४ प्रकारच्या समस्या दूर होणार आहे पहिली गोष्ठ ज्यांचा उद्योग किंवा व्यवसाय व्यवस्तिथ चालत नाही अशा लोकांनी हा उपाय नक्की नक्की करून पहा.त्याच्या उद्योग , व्यवसायात बरकत झालेली नफा झालेला दिसून येईल.दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना कोणताही रोजगार मिळत नाही ,
कोणतेही काम किंवा नोकरी मिळत नाही असे लोक सुद्धा नोकरी साठी कामासाठी हा उपाय नक्कीच करून पहा ज्या घरात तरुण तरुणी आहेत पण लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नाही किंवा विवाह कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बाधा येत असतील तर या बाधा दूर होऊन विवाह कार्य संपन्न होण्यासाठी हा उपाय करू शकता.
ज्यांच्या घरात गरिबी आहे दरिद्री आहे घरामध्ये पैसा येत नाही , लक्ष्मी स्थिर होत नाही अशा लोकांनी लक्ष्मी प्राप्ती साठी हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता.मात्र माता लक्ष्मीचा जो शुक्रवार आहे त्या दिवशी हा उपाय केल्यास त्याचे जास्त फळ मिळू शकते.
लक्ष्मी मातेचे मंदिर जर तुमच्या घराच्या जवळ असेल जर ते नसेल तर लक्ष्मी नारायण मंदिर असले तरी चालेल आणि यापैकी कोणतेही नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुमच्या घरात देवघर असेल , त्या देवघरात जर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल.
हा उपाय करत असताना तुम्हाला पिवळा चंदन लागेल , पिवळ्या रंगाचे चंदन नसेल तर हळदीचा वापर केला तरी सुद्धा चालेल.दोन्हींचा पण प्रभाव सामान रूपाने प्राप्त होईल.थोडेसे पिवळे चंदन किंवा हळद घ्यायची आहे.पाणी किंवा तेल वैगरे टाकून त्याचा गोळा बनवायचा आहे.पाणी हि टाका किंवा सुगंधी तेल वैगरे टाकून गोळा करून घ्या .
त्यानंतर उजव्या हाताच्या अनामिक आणि तर्जनी या दोन बोटांच्या मदतीने हा नंबर तुम्ही त्या मंदिरात लिहायचा आहे.जर भिंतीवर लिहिणे अशक्य असेल तर कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यावर हा नंबर तुम्ही लिहू शकता. नंतर हा कागद लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवायचा आहे . ज्यांना शक्य आहे
त्यांनी सफेद रंगाचा कापड घ्या , कपड्या वरती हा नंबर लिहा आणि तो कापड तुम्हाला त्या देवतेच्या चरणी अर्पण करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या देवघरात हा उपाय करणार असाल तर तुमच्या देवघरासमोरच बसून तुमच्या या दोन्ही बोटानी म्हणजे हि दोन बोटे एकत्र जुळवायची आहे
अनामिक आणि तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे आणि करंगळी जवळचे बोट हि दोन्ही बोटे जुळवून एकत्रित रित्या हा नंबर तुम्हाला लिहायचा आहे.असा हा कागद असेल किंवा कापड असेल हे तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही मातेच्या चरणी ठेवू शकता.
तसेच मंदिराच्या कोणत्याची भिंतीवर हा नंबर लिहायचा आहे ज्या मंदिरात तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या मंदिरात तुम्हाला ११ अगरबत्ती लावायच्या आहेत.त्यांना नैवेद्य भोग वैगरे दाखवायचा आहे.धूप दीप दाखवायचा आहे आणि मनोभावे तुमची जी इच्छा आहे जी मनोकामना आहे ती तुम्हाला बोलायची आहे.
त्या देवतेसमोर व्यक्त करायची आहे.देवघरात सुद्धा अगरबत्ती लावून तुम्हाला तुमची मनोकामना बोलायची आहे. आणि तुमची जेव्हा ती इच्छा पूर्ण होईल. जर तुम्ही तो कागद किंवा तो कापड मंदिरात ठेवला असेल तर अति उत्तम आहे मात्र जर घरी तुम्ही हा उपाय करत असाल तर तो कापड किंवा कागद जवळ पास च्या मंदिरात नेऊन ठेवायचा आहे.
त्या कागदावर किंवा कपड्यावर तो अंक लिहायचा आहे तो नीट एका – नंबर आहे ६४ . हा अंक तुम्हाला लिहायचा आहे संपूर्ण ब्रह्मांडात हा नंबर सर्व श्रेष्ठ मानला जातो. आणि मंदिरातच तुम्ही हा उपाय का करणार आहोत कारण मंदिरात सकारात्मक ऊर्जा असतात त्याचा लाभ खूप लवकर प्राप्त होतात.