नमस्कार मंडळी
रागावर नियंत्रण मिळवणे ही सर्वात मोठी कला आहे तेही विशेषता आजच्या घडीला जेव्हा सर्वांचा संयमाचा ताबा सुटलेला आहे ज्याला त्याला आपलंच म्हणणं खरं करण्याची घाई लागलेली असते. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग भांडणं चिडचिड करणे ही नित्याची बाब बनत चालली आहे. भयंकर राग येणाऱ्या लोकांना जमदग्नी ऋषींची उपमा दिली जाते.
अशातच बारा राशींपैकी पाच राशी अश्या आहे. ज्या रागाच्या बाबतीत अगदी जमदग्नी ऋषींच्या अवतार असतात. असं म्हणायला हव ज्याला आपण शीघ्रकोपी असं सुद्धा म्हणतो या लोकांना मानवी बॉम्ब म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्यामुळे या पाच राशींच्या लोकांपासून जरा सावध राहा. चला तर मग कोणता आहे त्या ५ राशी जाणून घ्याव्यात.
पहिली आहे वृषभ राशी – फट म्हणता ब्रम्ह हत्त्या असा यांचा स्वभाव ते कोणाचेही ऐकून घेत नाही. आपणच वादाला तोंड फोडत चिडचिड करून झाली की आपणच शांत होतात पण रागाची परिस्थिती हाताळणे हे काम यांच्या आणि त्यांच्या हाताबाहेर असतो. म्हणून यांच्या संपर्कात येणार यांनी आपण होऊन माघार घेणे शहाणपणाचे आहे.
दुसरी रास आहे सिंह राशी – या राशीत गुरगुर ने हा स्वभाव आहे. रागाच्या भरात ते समोरच्याला फाडून खातील आपले शब्द मागे घेणे हे त्यांना माहितीच नसते चूक असली तरी ते आपलेच घोडे पुढे दमटवतात रागाच्या भरात वाटेल ते बोलतात आपल्यापेक्षा वयाने कमी व उद्याने कमी असले लोकांवरती हक्क गाजवतात. अनेकदा ते सूचक भाष्य करून जातात ज्यामुळे त्यांची पोटातली गोष्ट सहज ओठावर येते.
तिसरी राशी वृश्चिक राशी – या राशीचे लोक खूप रागवतात पण राग व्यक्त करत नाही स्थानी विसरत ही नाही तो राग आपल्या मनात दीर्घकाळ ठेवतात. आणि वेळ प्रसंगी समोरच्यावर वचपा काढतात त्यांना जे हवं ते प्राप्त करतात काहीही चुकीचं झाले की यांना त्याचा राग आकाश-पाताळ एक करतो वरच्या वर राग व्यक्त करत नसले तरी जेव्हा करतात तेव्हा समोरची धडगत राहत नाही रागाच्या भरात ते आपल्या प्रिय व्यक्तीचा पाणउतारा करायलाही मागेपुढे बघत नाही यांचा राग मनात ठेवून आणि वेळप्रसंगी वचपा काढणे. हे समोरच्यावर भयंकर भारी पडतं.
चौथी राशी धनु रास – ही अग्नीतत्वाची रास आहे रागाच्या भरात ते स्वतः सकट सर्वांचा विनाश करू शकतात. परंतु त्यांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे त्यांना शांत झाल्यावर आपल्या चुकीची जाणीव होते. आणि ते आपली चूक मान्य देखील करतात आणि म्हणूनच यांच्या संपर्कात जाताना रागाच्या क्षणी वाद-विवाद टाळावा आणि शांत झाल्यावर ती नीट समजूत काढावी.
पाचवी राशी मकर राशी – या राशीचे लोक रागात सर्व काही गमावून बसतात राग ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी असते. दुसऱ्यावर रागवण्याचा त्रास त्यांना स्वतःलाही होत असतो. हे लोक काम अतिशय जबाबदारीने करतात परंतु रागामुळे त्यांच्यामध्ये नकारात्मकता भावना जास्त असते ही नकारात्मक ऊर्जा काम करण्यात खर्च झाली तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो या राशीच्या लोकांना बोलून अथवा समजावून सांगितल्यावर ते लवकर शांत होतात
मग यातून तुमची रास कोणती आहे तुमच्या घरातल्यांची रास कोणती आहे याबाबतचा तुमचा अनुभव कसा आहे