नमस्कार मंडळी
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका विशिष्ट वेळेच्या अंतराने प्रवेश करत असते आणि त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत आहे . तसंच हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असतो . १२ एप्रिल रोजी छाया ग्रह केतू तूळ राशीत प्रवेश करणार असून .
केतू ग्रहाचा हा बदल सुमारे दीड वर्षांनी होत आहे. केतूच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांना या राशीतून चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे . चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही ३ राशी
मकर: तुमच्या राशीतून केतू ग्रहाचे संक्रमण ११ व्या भावात असणार आहे , ज्याला उत्पन्न आणि लाभाचे स्थान म्हणतात. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे . तसेच, उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून पैसे मिळू शकणार आहे . व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो.
यासोबतच तुम्हाला यावेळी अचानक आर्थिक लाभही मिळण्याचे योग आहे . व्यवसायात नवीन डील पूर्ण करणार आहे . एकंदरीत केतूचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहणार असून . दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय शनि ग्रहाशी संबंधित आहे, जसे की पेट्रोल, दारू, तेल, लोह इत्यादी, त्यांना यावेळी विशेष लाभ मिळणार आहे
कर्क: या राशीच्या लोकांसाठी १२ एप्रिलपासून चांगले दिवस सुरू होऊ होणार आहे . कारण केतू ग्रह तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करणार असून . ज्याला सुखाचे घर, वाहन आणि मातेचा भाव म्हणतात. त्यामुळे केतूची ही स्थिती कर्क राशीच्या लोकांसाठी उत्साहवर्धक ठरू शकते. ज्यांना विविध भाषा शिकण्यात रस आहे अनुवादक म्हणून करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठीही हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे
तसेच, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्हाला बढती हि मिळू शकते , वेतनवाढ मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख देखील मिळणार आहे . दुसरीकडे, चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायातही यश मिळणार आहे
कुंभ: केतूचे राशी बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे . कारण केतू ग्रह तुमच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे , जो भाग्यस्थान आणि विदेश प्रवासाचे स्थान असणार आहे . त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे . तसेच, जे काही काम हातात ठेवाल, त्यात यश मिळेल.
यावेळी, तुम्ही व्यावसायिक संबंधांच्या बाहेर कुठेतरी प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळणार आहे . तसेच, ज्यांची वेतनवाढ थांबली आहे , त्यांना यावेळी बढती आणि वेतनवाढ मिळणार आहे