नमस्कार मंडळी,
सूर्योदयाच्या २ तास आधी ची वेळ म्हणजे साधारण ४.३० ते ६.३० ची वेळ ही ब्रम्हा मुहूर्ताची वेळ मानली जाते. याकाळात उठून इतर कोणतीही कामे न करता. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर भर दिला.तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो व फायदा होतो. पण नक्की असा कोणता चमत्कार आपल्या आयुष्यावर होवू शकतात
जर आपण ब्रह्म मुहूर्त वर उठलो. लवकर झोपे लवकर उठे त्यासं आयु आरोग्य लाभे. असं धर्मशास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त तर दूरच आपण सूर्योदयाच्यावेळी उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणामध्ये आपल्याला स्वतःवर लक्ष देता येतं.
पहाटे दिवसभराच्या तुलनेत मध्ये मनामध्ये विचार फार कमी असतात. त्यामुळे मन शांत होण्यास एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे ज्या क्षेत्रात तयारी करायचे आहे. त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्या ला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो.
सकाळच्या वेळेत केलं पाठांतर वाचन हे दीर्घ काळ आपल्या लक्षात राहतं हे तर आपल्या ला माहितीच आहे. स्मरण शक्ती वाढते आणि सकारात्मकता सुद्धा वाढते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी ब्रम्हा मुहूर्तावर उठून वेध पठाण करतं. रात्रीच्या वातावरणात रज-तम गुणांचे प्रमाण अधिक असते.
म्हणजेच त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते.तर पहाटे वातावरणात सात्विक म्हणजेच आनंददायी वातावरण असते. सकाळचा वातावरण शुद्ध ,शांत, थंड, आरामदायी, असतं. या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो. तसंच अभ्यासही चांगला होतो. म्हणून साधकाने ब्राह्ममुहूर्तावर साधना करावी असं सांगितले जातात. आजही योग्य शिबिरांमध्ये ब्राह्ममुहूर्तावर उठवलं जातं.
तसंच गायक ब्राह्ममुहूर्तावर उठून रियाज करतात. विद्यार्थी ब्राह्ममुहूर्तावर उठून वाचन पाठांतर करतात. रात्री जागरण करून केला अभ्यासापेक्षा सकाळी केलेला अभ्यास हा गुणवत्ता वाढवतो. पशुपक्षी निसर्ग हे ब्रह्म मुहूर्तावर जागे होतात. मनुष्याने देखील ब्रह्म मुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरु केली.
तर त्याला दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्य प्राप्त होतं. शिवाय तान तनाव नैराश्य नकारात्मकता या विचारापासून कायमची सुटका मिळते. विश्वास बसत नसेल तर किमान 21 दिवस तुम्ही ब्राह्ममुहूर्त वेळी उठण्याचा सराव करून पहा. चमत्कार तुम्हीच अनुभवाल