नमसकार मंडळी
आज आपण आषाढी अमावस्या म्हणजेच दिव्याच्या अमावस्याचे महत्व जाणून घरणार आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या परंतु सध्याच्या काळात गटारी अमावस्या म्हणूनच ही लक्षात राहते खरतर ही दिव्याची अमावस्या आहे पण खण्यापिण्यातच तुम्ही ती वाया घालवता दिव्याच्या अमावस्याचे महत्व व पूजा विधी कशी करावी
हे आता तुम्ही पहा या दिवशी घरातील सर्व दिवे ,समया ,कंदील इत्यादी वास्तू दुध आणि पाण्याने धुन स्वच्छ घासून लखलखीत करावे मग एका पाटावर स्वच्छ वस्त्र टाकून त्यावर ते दिवे ठेवावे पाट्या भोवती सुरेख रांगोळी काढावी आणि त्यानंतर ते दिवे तेल टाऊन प्रजोलीत करावे त्यानंतर शिरा खीर मिठाई असा कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावे.
आघाड्याची पाने दुर्वा आणि पिवळी फुले अक्षदा हळद कुंकू वाहून पूजन पूर्ण करावी एक कणकेचा दिवा करून त्यात शुद्ध तूप घालून लावावे आणि देवघरात ठेव्हावें नंतर तुमच्या घरतील लहान बालकाचे पूजन करावे मग ती मुलगी असो किंवा मुलगा असा भेद न करता वंशाचा दिवा म्हणून मुलाचे किंवा पणती म्हणून मुलींचे औक्षण करावे म्हणजेच
त्यांना ओव्हाळावे तुमचे पूजन पूर्ण झाले की दिव्यांची कहाणी ऐकावी किंवा वाचावी ही कहाणी ऐकल्याने लक्ष्मी प्राप्त होते असे धर्म ग्रंथामध्ये सांगितले आहे तामिळ देशात पशुपती नावाचा एक मोठा शेख राहत होता त्याला एक मुलगा विनित आणि एक मुलगी गौरी अशी दोन मुलं होती लहान पाणीच दोन्ही भावा बहिणींनी असे ठरवले होते की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनितच्या मुलांना द्याव्या
पुढे दोघांची लग्ने झाली आणि गौरीला तीन मुली झाल्या आणि विनित ला तीन मुले झाली.गौरीच्या लहान मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नंदात होती ती श्रीमंत झाली होती आणि ती अयशो आरामात ती जीवन जगत होती परंतु विनितचे दयव फिरल्यामुळे यो गरीब झाला आणि दारिद्र्यात त्याचे दिवस काडू लागला भाऊ गरीब झाला आहे त्याच्याकडे काही नाही हे पाहू
गौरी तिचे वचन विसरली आणि दोनी मुलीची लग्ने श्रीमंत मुलाशी लावून दिली आणि आता सगुणा साठीही मोट्या श्रीमंत घरातील मुलगा शोधू लागली आपल्या आईने मामाला लहान पनी दिलेले वचन मामाची परिस्थिती गरीब झाल्यामुळे मोडले ही गोष्ट सगुणेला समजली
आणि तिला खुप वाईट वाटले तिने मामाच्या लहान मुलाशी लग्न करायचे ठरवले आणि आईला तसे सांगितले गौरीने त्यासाठी साफ नकार दिला खुप भाडली वादविवाद केले पण सगुणाने तिचे म्हणणे काही सोडले नाही आणि शेवटी सगुणेचे लग्न विनित च्या मुलाशी लावून दिले लग्न होऊन ती विनीत च्या घरी आली आणि गरीबतच ती आपला सौंसार सांभाळू लागली
एकदा त्याच्या नगराचा राजा स्नाना साठी गेला असता आपली रत्नजडीत अंगठी काठावर ठेवली आणि पाण्यात उतरला तेवढ्यात तिथे एक घार अली आणि ती अंगठी चोचीत उचलू घेऊन गेली.अंगठी घेऊन घार सगुणेच्या छतावर बसली त्यात काही खायचे नाही समजल्यावर तिने ती अंगठी तिथेच टाकून दिली आणि उडून गेली सगुणेच्या छतावर काहीतरी चमकताना दिसले
म्हणून तिने वरती जाऊन पाहिले तर रत्नजडीत अंगठी तिला भेटली राजाची अंगठी हरवली आहे हे सगुणेला समजले होते ही राजाचीच अंगठी आहे हे तिला समजले व ती अंगठी राजाला नेऊन दिली राजा तिच्या या प्रामाणिक पणावर प्रसन्न झाला आणि बोला की तुला काय हवं आहे ते माघ सगुणेने राजाला सांगितले की येत्या शुक्रवारी आषाढ अमावस्या आहे
त्या दिवशी संपूर्ण राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे इतर कोणीही घरात दिवे लावू नये असा हुकूम द्या असे सांगितले राजांनी तसा हुकूम दिला मग शुक्रवारी सगुणेच्या घरभर दिवे लावले उपवास केला तो दिवस म्हणजे दिव्याची अमावस्या होय त्या दिवशी संपूर्ण राजात कोणाच्याच घरी दिवे लावलेले नव्हते फक्त सगुणेचे घर उजळले होते मग
तिच्या दोन्ही दिराना पुढच्या व मागच्या दारात उभे केले व पुडील दारात उभ्या असलेल्या दिराला सांगितले घरात येणाऱ्या सवासींन स्त्री घरातून परत कधी जाणार नाही अशी शपथ घाला व मागच्या बाजूला उभा असलेल्या दिराला घरा बाहेर पडणाऱ्या स्त्री ला घरात कधी येणार नाही. अशी शपथ द्यायला सांगितली त्या प्रमाणे दोन्ही दिराने केले आशा रीतीने देवी लक्ष्मी घरात अली व ती सदैव थेथेच राहिली
आणि अलक्ष्मी मागच्या दराने कायमची घरातून निघून गेली त्यामुळे सगुणेच्या घरची परिस्थिती चांगलीच सुधारली तिच्या घरात लक्ष्मी कायमची स्थिर झाली घरात अन्नधान्य आणि धनसंपत्ती वाढली अचानक सगुणेच्या परिस्थितीत बदल घडून आलेला पाहून राजातील लोक तिला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी कथा दिप अमावस्याची सांगितली जाते .
आषाढ अमावस्या का साजरी करतात तर श्रावण महिना म्हणजे सारखा पाऊस त्यात पोट खराब होण्याचे परिणाम होणे यामुळे जड अन्न पचायला अवघड जाते म्हणूंन माऊसाहर ह्या वेळेस बंद असतो त्याशिवाय नदी नाले दुथड्या वाहू लागते आणि माशांना हा काळ पर्जननासाठी खुप महत्वाचा असतो म्ह्णूनही माऊसाहरावर बंदी केली जाते म्हणून श्रावण महिन्यात महिन्याभर माउस खायचे नसल्याने
आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस गटारी अमावस्या म्हणूंन साजरी करतो आणि या दिवशी माऊसाहर करणार माऊस मासे यांचे सेवन करतात ही अमावस्या नेमकी कशी साजरी करायची हे स्वताच ठरव्हावें या दिवशी दिवे लावून आपल्या जीवनातील अंधकार दूर करायचा की खाऊनपिऊन गटारीत लोळायचे हे आपण आपलेच ठरव्हावें